Home राहुरी आ.तनपुरेंचे एकदिवशीय लाक्षणिक उपोषण

आ.तनपुरेंचे एकदिवशीय लाक्षणिक उपोषण

78
0

गणराज्य न्यूज राहुरी : पंतप्रधानांना माफी मागण्याची वेळ येते,यात प्रशासनाचे अपयश आहे. पंतप्रधानांनी माफी मागितली मात्र, त्वरित दुसरा विषय बदलून त्या माफीला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला. तो आमच्या सारख्या शिवभक्तांना आवडला नाही. ज्यांच्या हाती लगाम लावण्याचे काम आहे. त्यांचेच हाथ भ्रष्टाचाराने बरबटलेले असतील तर त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? असा जोरदार हल्लाबोल आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सरकारवर केला.

राहुरी येथे शनिवार दि. ३१ ऑगस्ट रोजी आयोजित एक दिवसीय लाक्षणिक उपोषण प्रसंगी आमदार तनपुरे बोलत होते.

सिंधुदूर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळला. या घटनेमुळे छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या व असंवेदनशील सरकारच्या विरोधात आमदार प्राजक्त तनपुरे आक्रमक झाले. राहुरी येथील बाजार समिती समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले.

या उपोषणाला मोठ्या संख्येने शिव प्रेमींनी व विविध संस्था संघटनांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठिंबा दिला. दरम्यान दिवसभर शिवभक्तांची गर्दी पहायला मिळाली. आमदार तनपूरे बोलताना पूढे म्हणाले कि, सरकारी यंत्रणेवर शासनाचा वचक राहिला नाही, हा वचक निर्माण होण्याची गरज आहे, कायद्या प्रमाणे सर्व यंत्रणा व्यवस्थित चालल्या कायद्याचा लगाम सर्व यंत्रणेला लागला तर निश्चितपणे सर्व सुरळीत होईल. परंतु ज्यांच्या हाती लगाम लावण्याचे काम आहे. त्यांचेच हाथ भ्रष्टाचाराने बरबटलेले असतील तर त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? असे मत आमदार तनपूरे यांनी व्यक्त केले.

यावेळी सकाळच्या दरम्यान शिवचरित्रकार डाॅ. शिवरत्न शेटे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तेव्हा ते म्हणाले कि, २६ डिसेंबर २००४ मध्ये सुनामीची लाट आली होती. ती सुनामी म्हणजे सागरी वादळ होतं.तरी, शिवरायांच्या पुतळ्याला हलवू शकले नाहीत. परंतू ४५ किलो मीटर वेगाच्या वाऱ्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला कसा? तुटलेल्या पुतळ्याला पाहून खूप यातना झाल्यात. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून ज्यांनी ज्यांनी टक्केवारी घेतली, त्यांचा कडेलोट केला पाहीजे असे शिवरत्न शेटे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी लोणी येथील प्रतिभाताई घोगरे यांनी आपल्या भाषेत सरकारवर जोरदार कडाडून टिका करत आमदार प्राजक्त तनपूरे यांच्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास पाठिंबा दर्शवला.

यावेळी उपोषण स्थळी समितीचे सभापती अरुण तनपुरे, जि.प माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे, सुरेश वाबळे, विजय डौले, सागर तनपूरे, आप्पासाहेब ढूस, किरण कडू, सुरेश निमसे, ज्ञानेश्वर बाचकर, रामदास बाचकर, निलेश जगधने,साठे सर, दादासाहेब मुंडे आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच वकिल बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रशांत मुसमाडे यांच्या नेतृत्वात राहुरी तालुका बार असोसिएशनच्या वतीने तसेच वंचित बहुजन आघाडी, संतसेना नाभीक संघटना व मुस्लिम समाजाच्या वतीने उपोषणास पाठिंबा देऊन सरकारचा निषेध व्यक्त केला.

सायंकाळी शिवचरित्रकार हसन सय्यद यांचे व्याख्यान झाले. छत्रपती शिवरायांचा अवमान झाल्याप्रकरणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणारे आमदार प्राजक तनपुरे हे जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत.यातून उद्याच्या काळात एक चांगली चळवळ उभी राहील. असा विश्वास शिवचरित्रकार हसन सय्यद यांनी व्यक्त करत उपस्थित शिवभक्तांना छत्रपती शिवरायांचे कार्य,कर्तुत्व जाती-धर्माच्यापलीकडे त्यांच असलेलं काम याचा संपूर्ण इतिहास शिवव्याख्याते सय्यद यांनी शिवभक्त समोर मांडला.

मच्छिंद्र सोनवणे,भारत तारडे,रामेश्वर सोनवणे,सुनील अडसुरे,मिलिंद अनाप,रामदास बाचकर, ज्ञानेश्वर बाचकर, रखमाजी जाधव,बाळासाहेब खुळे,गोरक्ष पवार,किरण अत्रे,रविंद्र आढाव,अभिजित ससाणे,बाळासाहेब उंडे,सचिन वराळे,सुयोग नालकर,सूर्यभान शिंदे,दत्तात्रय कवाने, चंद्रकांत पानसांबाळ,सिताराम काकडे,किसनराव लोटके,मधुकर घाडगे, सचिन बोरुडे,महेश उदावंत,मंजाबापु कोबरणे, बापू कोबरणे, महेश पानसरे,अँड.ताकटे,प्रकाश भुजाडी,नितीन बाफना,किसन जवरे आदींनी उपस्थित राहून मनोगत व्यक्त करत एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास पाठींबा दिला.संतोष आघाव यांनी सुत्रसंचालन केले….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here