मुंबई – अबु आझमी यांना औरंगजेबाबद्दल केलेलं वक्तव्य भोवलं असून त्यांचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
आज विधानसभेत चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला. काही दिवसांपूर्वी विधानसभेच्या परिसरात समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी वक्तव्य केलं होतं. त्यावर राजकीय वर्तुळातून संताप व्यक्त करण्यात आला होता. राजकीय नेत्यांकडून त्यांच्या कारवाई करण्याची मागणी केली जात होती. अखेर निलंबित करण्यात आले.