गणराज्य न्यूज राहुरी : ग्रामीण भागातील तरुणांनी सैन्य दलात भरती व्हाव.उत्कृष्ट व्यवसायाची निवड करून यशस्वी उद्योजक व्हावं, चांगली शेती करावी असे प्रतिपादन सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल साहेबराव शेळके यांनी केले.
मातोश्री कोंडाबाई रामदास राजदेव यांच्या अमृत महोत्सव निमित्त अभिष्टचिंतन सोहळा व भारतीय सेवेचा 35 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करत सेवानिवृत्त कर्नल सुनील रामदास राजदेव यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा बुधवार 12 मार्च रोजी ब्राम्हणीतील देवी मंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी लेफ्टनंट कर्नल शेळके बोलत होते.
प्रारंभी ब्राम्हणी बसस्टँड येथे नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. सजवलेल्या खुल्या चार चाकी आकर्षक गाडीतून त्यांची भव्य मिरवणूक पार पडली. बाल वारकऱ्यांनी टाळ वाजून हरिनामाचा जयघोष करत करत कर्नल सुनील राजदेव यांच स्वागत केल.झेडपी शाळेत पुस्तकालयाचे उद्घाटन करत साऊंड सिस्टिमसाठी अकरा हजार रुपये शाळेस देण्यात आले.
देवी मंदिर परिसरात आयोजित कार्यक्रमात सुरुवातीला हभप भगवान महाराजांचे कीर्तन झाले. आईचा व लेकाचा सन्मान एकाच वेळी होत असून एक आगळावेगळा आदर्श कार्यक्रम होत असल्याचे मत मचे महाराजांनी व्यक्त केले.
सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल साहेबराव शेळके हे होते. याप्रसंगी निवृत्त जिल्हा सैनिक अधिकारी विद्यासागर कोरडे,लेफ्टनंट कर्नल नागरे,लोकनियुक्त सरपंच सौ. सुवर्णा सुरेश बानकर आदीसह ब्राह्मणी ग्रामस्थ नातेवाईक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजदेव परिवाराच्यावतीने सौ.ताराबाई व श्री.पोपटराव राजदेव, सौ आशाबाई व कर्नल सुनील राजदेव, डॉ.किशोर राजदेव,अमोल राजदेव, आर्किटेक हर्षल राजदेव, लेफ्टनंट तन्मय राजदेव यांनी सर्वाचे स्वागत केले.दरम्यान मान्यवर पाहुण्यांनी आपले मनोगत करत सुंदर अशा कार्यक्रमाच विशेष कौतुक करत कर्नल सुनील राजदेव यांच्या सेवेच्या कार्यकिर्तीतील कार्याची आठवण करुन देत कौतुक केलं केले.देश सेवेनंतर
भविष्यात गावासाठी काम करणार आहे.सामाजिक कार्याच्या माध्यमातून सेवा करण्याचा प्रयत्न असेल. असे मत कर्नल सुनील राजदेव यांनी व्यक्त करत कार्यक्रमास उपस्थित बद्दल सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश हापसे यांनी केले.